१३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प अंतिम टप्प्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |
 
 
आजपर्यंत लागली ११ कोटी ८८ लाख झाडे
चंद्रपूर : हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन सुरु झालेली वृक्ष लागवडीची चळवळ लोकचळवळीत रुपांतरीत झाली असून या महत्वाकांक्षी उपक्रमात यावर्षी १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आज २५ तारखेपर्यंत राज्यात ११ कोटी ८८ लाख २९ हजार ०७८ झाडं लागली असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
 
 
आतापर्यंत झालेल्या वृक्षलागवडीमध्ये २८ लाख ५८ हजार २७६ वृक्षस्नेहींनी सहभाग नोंदवला तर १ लाख ४५ हजार ६८३ स्थळांवर ही वृक्षलागवड झाली आहे. वृक्षलागवडीमध्ये वन विभागाने ६ कोटी ८७ लाख ३८ हजार ८८३, वनेत्तर क्षेत्रात ४ कोटी १४ लाख ४७ हजार १९३, माय प्लांट ॲप द्वारे २ लाख ३९ हजार ६१०, रोपे आपल्या दारी कार्यक्रमातून २ लाख ४९ हजार ३७६, हॅलो फॉरेस्ट १९२६ द्वारे ९७७० वृक्षलागवडीची ऑनलाईन पद्धतीने नोंद झाली आहे तर ऑफलाईन पद्धतीने ८१ लाख ४४ हजार २४६ रोपे लागल्याची माहिती वन विभागाकडे देण्यात आली आहे.
 
 
राज्यात सर्वाधिक वृक्षलागवड नांदेड जिल्ह्यात झाली आहे ती ७१ लाख ९२ हजार ८९३ इतकी आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे ६७ लाख १७ हजार १६३ रोपे लागली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आहे तिथे ६२ लाख ७१ हजार ७३८ वृक्षलागवड झाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात ५९ लाख ५२ हजार ५५८, गडचिरोली जिल्ह्यात ५१ लाख९० हजार ७१७ वृक्षलागवड झाली आहे. उस्मानाबाद, अहमदनगर, नंदूरबार, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये ४० लाखांहून अधिक वृक्षलागवड झाली आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@