अनंतनाग : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये आज सुरक्षा रक्षकांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास यश मिळाले आहे. काल पासून सुरु असलेल्या चकमकीत हे यश सुरक्षा रक्षकांना प्राप्त झाले आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली आणि या चकमकीत या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देखील सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती आले होते. या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांनी एका दहशतवाद्याला ठार केले होते. सध्या हंदवाडा, अनंतनाग, पुलवामा या भागांमध्ये सुरक्षा रक्षक चोख बंदोबस्त ठेवत आहेत. दहशतवादी कधीही हल्ला करत असल्याने सुरक्षा रक्षकांना तयार राहावे लागते.
मागील झालेल्या चकमकीत बरेच दहशतवादी मारल्या गेले आहेत. त्यामुळे या सगळ्या भागांमध्ये सध्या सुरक्षा रक्षकांकडून चोख सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आली आहे.