उत्तराखंडमध्ये ११५ भाविक अडकले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2018
Total Views |



गुंजी : कैलास-मानसरोवर यात्रेसाठी देशातून गेलेले ११५ भाविक उत्तराखंडमध्ये अडकून पडले आहेत. उत्तराखंडच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील खराब वातारणामुळे हे सर्व भाविक पर्वतीय भागामध्ये अडकून पडले असून भारत सरकार या सर्व भाविकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत.

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी याविषयी माहिती दिली असून गुंजी येथे वातावरण खराब झाला ११५ भाविक अडकून पडले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान या सर्व भाविकांना साध्या गुंजी येथे एका सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले असून इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस आणि कुमाव विकास प्राधिकरण हे सध्या या भाविकांची काळजी घेत आहेत, असे स्वराज यांनी सांगितले आहे. याचबरोबर वातावरण निवळल्यानंतर या सर्व भाविकांना सैनिकी विमानांमधून सुखरूप परत आणण्यात येणार आहे. सध्या या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात असून इतर सुविधा देखील पुरवल्या जात आहेत.



दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला देखील कैलास-मानसरोवर यात्राला गेले १५०० भाविक नेपाळ-तिबेट भागामध्ये अडकून पडले होते. यावेळी देखील भारत सरकारने नेपाळच्या मदतीने या सर्व भाविकांची सुखरूप सुटका केली होती.
@@AUTHORINFO_V1@@