कल्याणमधील खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |

आतापर्यंत पाच जणांनी गमावले प्राण; प्रशासन मात्र गप्प


 
 
कल्याण (ठाणे ) : कल्याणमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सुरु असलेले वाहनचालकांच्या मृत्यूचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आज आणखी एकाला आपला प्राण गमवावा लागला असून खड्ड्यांमुळे आतापर्यंत एकूण पाच जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. परंतु अजूनही प्रशासन मात्र यावर कसल्याही प्रकारची कारवाई करता दिसून येत नाही.
कल्याणमधील गांधारी पुलाजवळ आज सकाळी ही घटना घडली आहे. गांधारी पुलाजवळ एक युवक दुचाकीवर बापगोणकडे जात असताना रस्त्यामध्ये असलेल्या एका खड्ड्यांमध्ये त्याची दुचाकी आदळली. त्यामुळे तोल जाऊन युवक खाली कोसळला. इतक्या मागून येणाऱ्या एका ट्रकने संबंधित दुचाकीस्वाराला चिरडल्यामुळे त्याला आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे कल्याणमधील रस्ते हे मृत्यूचे सापळे बनले असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान गेल्या दोन आठवड्यांमध्ये आणखी चार जणांना अशाप्रकारे आपला जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे कल्याणमधील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून यावरून वाहन चालवताना अनेकांची मोठी कसरत होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सातत्यने अपघात होत आहेत. अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@