आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आज प्रत्येक दिग्गज व्यक्ती, राजकारणातील महत्वाचे व्यक्ती असू देत नाही तर सिनेसृष्टीतील लोक सर्वच आता ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम आदीवर उपस्थित आहे, असे असताना माजी उपपंतप्रधान हामिद अंसारी यांचे समाज माध्यमांवर वास्तव्य दिसून येत नाही. याविषयी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला असता "समाज माध्यमांवर येण्याची आता तरी माझी इच्छा नाही." असे वक्तव्य केले आहे.
"माझ्याकडे कंप्यूटर आहे आणि पुस्तकं आहेत मी त्याच्यातच खूश आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत मी अजूनही २० व्या शतकातच आहे." असेही ती यावेळी म्हणाले.
माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सतत समूहाद्वारे मारहाण केल्या असल्याच्या घटनांवर देखील वक्तव्य केले. " जनतेने स्वत:च्या हातात कायदा घेऊ नये, त्यासाठी भारतात न्याय व्यवस्था आहे." असेही ते यावेळी म्हणाले.