पुलाचे काम त्वरित करण्याची नागरिकांची मागणी
मुरबाड: मुरबाड तालुक्यातील बिरवाडी, मासले, -बेलपाडा, फणसवाडी, शिखरपाडा, ऊबंरवेढे या गावाना जोडणारा मुरबाडी नदीवरील नविन पुलाचे काम सुरु असताना जुन्या पुलाच्या नादुरुस्तीमुळे व त्याची संरक्षण भिंत वाहुन गेल्याने बिरवाडी या प्रकल्पग्रस्त गावाला जोडणारा पुल वाहतुकीसाठी बंद केल्याने कामगार व विद्यार्थ्यांना १५ किमीची पायपीट करावी लागत आहे. या गावांना मुरबाड-कल्याणकडे जाणार्या कामगार, विद्यार्थी यांना मासले-बेलपाडा या गावातुन जावे लागत आहे. ज्यामुळे नागरिकाचे हाल होत आहे. राष्ट्रीय महामार्ग ६१ ला जोडणार्या या पुलाची नादुरुस्ती हि चार गावातील नागरीकांची डोकेदुखी ठरली असुन सतत पडणार्या पावसामुळे बिरवाडी पुल कमकुवत झाला असुन ग्रामस्थानी आणि वाहनचालकांनी आपल जीव धोक्यात घालुन या पुलावरुन प्रवास करण्याचे टाळावे असे आवाहन तहसिलदार सचिन चौधर यानी केले आहे.