धुळ्यात जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |

मुले चोरणारी टोळी समजून जमावाकडून बेदम मारहाण




धुळे : 'मुले चोरणारी टोळी' समजून गावकऱ्यांकडून करण्यात आलेल्या बेदम मारहाणीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज धुळे येथे घडली आहे. गावातील मुले चोरण्यासाठी म्हणून हे लोक गावात आल्याचा संशय मनात बाळगून गावकऱ्यांनी पाच जणांची हत्या केली आहे. तसेच या पाच जणांना वाचवण्यासाठी म्हणून आलेल्या पोलिसांना देखील गावकऱ्यांनी मारहाण केली असून यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान हत्या झालेल्या नागरिकांची ओळख अजून पटलेली नसून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून अधिक फौजफाटा संबंधित गावाकडे पाठवण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील सिक्री तालुक्यामध्ये आज दुपारी ही घटना घडली आहे. सिक्रीतील राईनपाडा या गावात आज सकाळी काही लोक आपल्या वैयक्तिक कामासाठी म्हणून आले होते. परंतु याच दरम्यान गावात मुले पळवण्यासाठी म्हणून एक टोळी दाखल झाल्याची अफवा गावामध्ये उठवण्यात आली. थोड्याच वेळात ही अफवा सबंध गावात पसरल्यानंतर संशयाच्या भुताने पछाडलेल्या गावकऱ्यांनी पाच जणांना घेरून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या बेदम मारहाणीमध्येच या पाचही जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या नागरिकांना वाचवण्यासाठी म्हणून मध्ये आलेल्या पोलिसांना देखील गावकऱ्यांनी मारहाण केली. यामध्ये दोन पोलीस जखमी झाले.
@@AUTHORINFO_V1@@