राजीव गांधीप्रमाणेच 'मोदीं'च्याही हत्येचा माओवाद्यांचा कट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |

माओवाद्यांचे आणखी एक पत्र पुणे पोलिसांकडून बाहेर





पुणे :
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील हत्या करण्याचा माओवाद्यांचा डाव असल्याचा धक्कादायक खुलासा आज पुणे पोलिसांनी केला आहे. कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे मिळालेल्या पत्रांमध्ये आणखी एक पत्र पोलिसांना मिळाले असून यामध्ये 'राजीव गांधीबरोबर झालेल्या घटनेची पुनरावृत्ती मोदीबरोबर करण्याविषयी विचार सुरु असल्याचा' स्पष्ट उल्लेख माओवाद्यांनी केला आहे. पुणे पोलिसांनी हे पत्र जाहीर केले असून पत्रातील माहितीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

कॉम्रेड प्रकाश याला माओवाद्यांनी हे पत्र गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये लिहिले होते. यामध्ये पंतप्रधान मोदींच्या 'हिंदू' अजेंड्याचा सध्या भारतातील नागरिकांवर मोठा परिणाम पडत असल्याचा उल्लेख नक्षलवाद्यांनी यात केला आहे. तसेच मोदींनी तब्बल १५ राज्यांमध्ये आपली सत्ता स्थापन केली असून मोदींचा विजय असाच सुरु राहिला तर भविष्यात आपल्या सर्वांसाठीच हे अत्यंत घातक ठरेल. त्यामुळे कॉम्रेड किसन आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये 'मोदी-राज' नष्ट करण्यासंबंधी चर्चा सुरु असून राजीव गांधीबरोबर झालेल्या घटनेची पुनरावृत्ती करण्याविषयी चर्चा सध्या सुरु आहे. ही घटना मोदींच्या एखाद्या रॅलीमध्ये घडवून आणण्याविषयी विचार केला जात आहे' असा स्पष्ट उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे कोरेगाव-भीमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर होते हे उघड झाले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@