झोजिला या भागाचे ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व आहे. १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धादरम्यान या भागावर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केला होता. हा भाग कारगिलच्या खूप जवळ असल्यामुळे भारतीय सेनेने 'ऑपरेशन बायसन' राबवत या भागावर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवले. त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या देखील या भागाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.