डोंबिवली: डोंबिवली प्रवेशद्वारावर येणार्या सर्वांचे बिनचूक लक्ष वेधणारी फेरीवाल्यांची गर्दी आता. पादचाऱ्यांसाठी रोजच दुखणं बनली आहे. या फेरीवाल्याने विरोधात वारंवार कारवाई होऊन सुद्धा त्यांच्या साठी व्यवस्थित बाजारपेठ उपलब्ध होताना दिसत नसल्या कारणाने हे फेरीवाले वारंवार रेल्वे पूल, रस्ते,फूटपाथ वावरताना दिसतात. त्यामुळे मस्त चाललय या फेरीवाल्यांच असा सूर नागरिकांन मधून उमटत आहे.
दर सोमवारी पूर्वेला व बुधवारी पश्चिमेला भरणारा बाजार हा नागरिकांसाठी अपेक्षित बाजार असतो पण दरोरोज बसणारे फेरीवाल्यांमुळे नागरिकांना रस्त्यावर चालण्यासाठी जागेचा आभाव दिसून येतो. रिकामी जागा दिसताच त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण होते त्यामुळे रेल्वे पूल, स्टेशन प्रवेशद्वार, फुटपाथ या फेरीवाल्यांमुळे व्यापलेले दिसतात.डोंबिवली पूर्वेला स्टेशनला लागून असलेल्या रेल्वे पुलावर फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी आयुक्त ई. रवींद्रन यांनी पदभार स्वीकारतच कल्याण रेल्वे स्थानकातील फेरीवाले हटवण्याची कारवाई जोमाने केली होती. यानंतर आयुक्त बदलताच या धडाकेबाज कारवाईचा अनुभव डोंबिवलीकारानां फारसा घेता आला नाही. महापालिकेच्या महासभेत लोकप्रतिनिधींकडून या प्रश्नावर वारंवार आवाज उठविण्यात आले आहे. यापलीकडे हि परिस्थिती जैसे थे राहिल्याचे चित्र आहे. एकीकडे रस्त्यावरील वाहतूक कोंडीने नागरिक बेजार झाले असताना पदपथावर झालेले फेरीवाल्यांचे अतिक्रमण पाहता आम्ही चालायचे कुठून असा सवाल त्यांच्या कडून उपस्थित केला जात आहे . दरम्यान,
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि केंद्र आणि राज्यशासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय फेरीवाला धोरण महापालिकेने तयार केले आहे. मात्र त्याच्या अमंलबजावणी अभावी फेरीवाला अतिक्रमणाचा विषय जैसे थे राहिला आहे . एलफिस्टन स्थानकात झालेल्या दुर्घटने नतर स्टेशन परिसरातून फेरीवाले हटविण्याचा राज्यशासनाच्या आदेशाचा विसर कल्याण-डोंबिवली महपलिकेला पडला आहे. तसेच वारंवार होणार्या फेरीवाला विरोधी पथक कारवाईचा फेरीवाल्यांवर कोणताही परिणाम होत नाही. फेरीवाल्यांपासून स्टेशन मुक्त करण्याच्या तयारीत लागलेली कल्याण डोबिवली महापालिका प्रत्यक्ष रित्या मात्र लपाछुपीचा खेळ खेळताना दिसून येत आहे. दरम्यान, नुकतेच महापालिकेकडून या फेरीवाल्यांचे प्रभाग निहाय वर्गीकरण करण्याचे योजिले होते पण त्या बाबत हि योग्य ती कारवाई होताना दिसून येत नाही. याबाबत प्रभाग निहाय वर्गवारीचे काम अंतिम टप्प्यात असून ते झाल्यावर फेरीवाल्यांना त्या ठिकाणी बसणे बंधनकारक करण्यात येईल असे ग प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी सांगितले.