'गेल्या चार वर्षांमध्ये देशातील कृषी उत्पादनात वाढ'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2018
Total Views |

केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची माहिती 




पटना :
केंद्रीय सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाची धोरणे राबवत असून सरकारच्या या धोरणांमुळेच गेल्या चार वर्षांमध्ये देशातील कृषी उत्पादन २ कोटी टनांनी वाढले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी आज दिली. बिहारची राजधानी पटना येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते आज बोलत होते.

मोदीसरकार सत्तेत येण्याअगोदर वर्ष २०१० ते २०१४ या चार वर्षांच्या कालावधीमध्ये देशाचे सरासरी कृषी उत्पादन हे एकूण २५ कोटी ५० लाख टन इतके होते. परंतु मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या उत्पादनात सातत्यने वाढ होत आली असून  २०१७-१८ या एकाच वर्षामध्ये हे प्रमाण २८ कोटी टनांवर पोहोचले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यंदाच्या वर्षी देखील यामध्ये या उत्पादनामध्ये लक्षणीयरीत्या वाढ होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याचबरोबर केंद्र सरकारने घेतलेल्या अनेक शेतकरी हिताच्या योजनांविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. केंद्र सरकारने सुरु केलेल्या 'प्रधानमंत्री फसल बिमा योजना' या योजनेचे सामान्य शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा झाला असून यामुळे प्रत्येक वर्षी शेती करणाऱ्या शेतकऱ्याची शेती ही पूर्णपणे सुरक्षित झाली आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.
@@AUTHORINFO_V1@@