पाकिस्तान कडून वारंवार करण्यात येणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज पुन्हा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या लष्कराने शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केल्याने सीमा सुरक्षा दलाचे २ जवान शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरच्या अखनूर येथे आज सकाळी ही घटना घडली. या घटनेत सीमा सुरक्षा दलाच्या २ जवानांची शहीद झाली आहेत.
हवालदार विजय कुमार पांडेय व एएसआय सत्यनारायण यादव अशी शहीद जवानांची नावे आहेत. पाकिस्तान लष्कराने नुकतेच शस्त्रसंधीचे पालन करू हे दिलेले आश्वासन न पाळता शस्त्रसंधीचा भंग केला आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात भारतीय सैन्यदलाने दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिम थांबविली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान सैन्यदल शस्त्रसंधीचा सातत्याने भंग करत असल्याच्या घटना घडत आहेत.