येमेनमध्ये अडकलेल्या ३८ भारतीयांची नौदलाकडून सुटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली : आखाती देशांमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे एका बेटावर अडकून पडलेल्या ३८ भारतीयांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश आले असून या सर्वनागरिकांना घेऊन भारतीय नौदलाचे आयएनएस सुनयना ही युद्धनौका भारताच्या दिशेने रवाना झाली आहे. हे सर्व भारतीय सुखरूप असून सर्वांची काळजी घेतली जात असल्याचा संदेश नौदलाने भारत सरकारला पाठवला आहे.



अरबी सागरामध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या मेकूनु या चक्रीवादळामुळे येमेनजवळील सोकोट्रा बेटावर एकूण ३८ भारतीय नागरिक अडकून पडले होते. याची माहिती भारत सरकारला मिळाल्यानंतर भारत सरकारने तातडीने नौदलाल या नागरिकांना वाचवण्याचे आदेश दिले. यानंतर नौदलाने 'मिशन निस्तार'ची घोषणा करत अरबी सागरात तैनात असलेल्या आयएनएस सुनयनाला या कामगिरीवर पाठवले. भारतीय नौदलाने देखील ही कामगिरी यशस्वी पार पाडत सर्व भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका केली. तसेच नागरिकांचे काही व्हिडीओ देखील भारत सरकारला पाठवले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@