डीआरडीओकडून अग्नी-५ ची यशस्वी चाचणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2018
Total Views |


बालेश्वर : भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अग्नी-५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची आज सहावी यशस्वी चाचाणी घेण्यात आली आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओकडून ही चाचणी घेण्यात आली असून या यशस्वी चाचणीमुळे भारताचे संरक्षण लष्कर अधिक शक्तिशाली झाले आहे.



ओडीसा किनारपट्टीजवळील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम या बेटावर आज सकाळी ही चाचणी घेण्यात आली. सकाळी बरोबर ९ वाजून ४८ मिनिटांनी समुद्रामध्ये काही अंतरावर निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी म्हणून अग्नी-५ ला सोडण्यात आले. यानंतर अल्पावधीतच क्षेपणास्त्राने आपल्या लक्ष्याचा वेध घेत, आपली क्षमता सिद्ध केली. या चाचणी वेळी भारतीय सैन्येतील अनेक बडे अधिकारी, डीआरडीओचे प्रमुख अधिकारी आणि संरक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती याठिकाणी उपस्थित होते. चाचणी यशस्वी झाल्यानंतर सर्व जणांनी यासाठी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करत, सर्व भारतीयांना यासाठी शुभेच्छा दिल्या.


अग्नी-५ च्या या यशस्वी चाचणीमुळे भारतीय क्षेपणास्त्राची मारक क्षमता कित्येक पट्टीने वाढली आहे. अग्नी-५ चा हा भारताच्या 'अग्नी' मोहिमेमधील क्षेपणास्त्राची पाचवी आवृत्ती असून याची मारक क्षमता ही ५ हजार किलोमीटर इतकी आहे. तसेच एकाच वेळी १ हजार ५०० किलोग्रॅम स्फोटके वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये असल्यामुळे हे एका अणु बॉम्ब इतकी शक्ती यामध्ये आहे. याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञान, अतिउच्च नेव्हिगेशन सिस्टीम यामुळे अत्यंत जलद गतीने अचूक मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे. त्यामुळे आता चीन, पाकिस्तानसह युरोप आणि आफ्रिका खंडातील अनेक देश भारताच्या या क्षेपणास्त्राच्या मारक टप्प्यात आले आहेत. त्यामुळे पृथ्वी-५ ची ही यशस्वी चाचणी भारताला सामरिक दृष्ट्या देखील अत्यंत ठरलेली आहे.
@@AUTHORINFO_V1@@