काही राजकीय पक्षांना देशात शांती नको आहे : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
मगहर : देशातील काही महत्वाच्या राजकीय पक्षांना देशात शांती आणि विकास नको आहे शांती आणि विकास हा त्यांच्या मनात कलह निर्माण करतो अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज उत्तर प्रदेशमधील मगहर या ठिकाणी जनसभेला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी मगहरमध्ये नरेंद्र मोदी यांनी संत कबीर अकादमीची पायाभरणी केली. या अकादमीमुळे संत कबीर यांच्या महान विचारांना जाणण्याचा मार्ग नागरिकांना मिळेल असे ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
 
 
 
 
 
काही राजकीय पक्षांनी संत कबीर यांच्या लिखाणाला वाचले नाही त्यामुळे त्यांच्या मनात सत्ताप्रेम, अशांतता आणि पैसा कमवण्यासाठी भूक वाढत गेली आहे. मात्र खरी जनसेवा म्हणजे शांततेतून विकास करणे ही होय. व्यक्तीने जीवनात मेहनतीने मिळवलेला पैसा टिकतो प्रामाणिकपणे व्यवहार केला टर त्यामुळे आपण दुसऱ्यांच्या नजरेत प्रामाणिक राहतो असे सल्ला त्यांनी यावेळी दिला. 
 
@@AUTHORINFO_V1@@