उल्हासनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या एका कार्यक्रमात रामदास आठवले बोलत होते. आठवले यावेळी म्हणाले की, भारताने पाकिस्तानशी लढाई केली तर पाकिस्तान शिल्लक राहणार नाही. उल्हासनगरात मोठ्या संख्येने सिंधी समाज आहे. सिंधी समाज पाकिस्तान मधून भारतात आला आहे. मेहनतीने भारतात राहणारा राष्ट्रप्रेमी सिंधी समाजाने प्रगती केली आहे. सिंधी समाजाला आरक्षण देण्याची झालेली मागणी योग्य असून त्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही त्या समाजांना जातींना स्वतंत्र प्रवर्ग करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी आराक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्यात यावी. सामाजिक आरक्षण ५० टक्के आणि आर्थिक निकषावरील आरक्षण २५ टक्के करून त्यातच मराठा, जाट, गुज्जर या जातींप्रमाणे सिंधी समाजाला ही आरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी आठवले यांनी यावेळी केली.