मोदी औरंगजेबांपेक्षाही जास्त क्रूर : काँग्रेसचे प्रत्यूत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |

 
 
मुंबई :  “ देशात सध्या अघोषित आणीबाणी सुरु आहे. इंदिरा गांधी यांना दोष गेऊन काहीच होणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काय?" असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी उपस्थित केला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे आणीबाणी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी मत व्यक्त केले. त्यावर प्रत्यूत्तर देत रणदीप सुरजेवाला यांनी टीका केली.
 
 
 
 
माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला ४३ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर आरोप केले होते.
 
काँग्रेस आजही आणीबाणीच्याच मानसिकतेत असून न्यायमूर्तींवर महाभियोग आणणं आणि आणीबाणी लादणं यामध्ये काहीही फरक नाही,” असं विधान मुंबईतील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यावर उत्तर देत सूरजेवाला यांनी "आणीबाणीच्या आठवणी काढून अच्छे दिन कसे येणार?" असा प्रश्न उपस्थित केला.
@@AUTHORINFO_V1@@