सैफुद्दीन सोझ यांचे ना‘पाक’ इरादे कधीही सफल होणार नाहीत : आ. भातखळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |



 

मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) : सैफुद्दीन सोझ यांच्या या विधानामुळे काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. परंतु, सोझ यांच्यासारख्यांचे ना‘पाक’ इरादे कधीही सफल होणार नाहीत.” अशा शब्दांत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोझ यांच्या वादग्रस्त विधानावर तोंडसुख घेतले. स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मिरी जनतेची पहिली प्राथमिकता असल्याचे खळबळजनक वक्तव्य सोझ यांनी केले आहे.

सैफुद्दीन सोझ यांच्या या विखारी फुत्कारानंतर अनेक स्तरांतून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. सोझ यांच्या या वक्तव्याबाबत दै. मुंबई तरूण भारत’शी बोलताना आ. अतुल भातखळकर म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर राज्यातील विशेषतः काश्मीर खोऱ्यातील जनता भारतापासून विलग होण्याच्या भूमिकेत आहे, हा सोझ यांच्यासारख्यांचा भ्रम आहे. गेल्या अनेक निवडणुकांत अतिरेक्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलेले असतानाही खोऱ्यात जनतेने नेहमीच भरभरून मतदान केले होते, असेही भातखळकर यांनी नमूद केले.

या सर्व बाबींचा विचार करता, सैफुद्दीन सोझ यांच्यासारख्या नेत्यांचे ना‘पाक’ इरादे कधीही सफल होणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, नुकत्याच हुतात्मा झालेल्या औरंगजेबासकट देशातील जवानांनी काश्मीरसाठी सांडलेले रक्त वाया जाणार नाही, असा आम्हाला विश्वास वाटतो, असेही अतुल भातखळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@