धुळ्यात बालिकेच्या खूनप्रकरणी निषेध मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, आरोपींना फाशी देण्याची मागणी

 
 
धुळे : जळगाव येथील समतानगरातील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी धुळे येथील वाल्मिकी मेहतर समाजातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाजयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
 
 
सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरवात झाली. तेथून पोलीस अधीक्षक कार्यालय, कमलाबाई कन्या हायस्कूलमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.
यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले. त्यात म्हटले आहे की, जळगाव येथील समता नगरात राहणाजया आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करून, तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिची निर्दयपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे समाजातील नागरिकांनामध्ये संताप निर्माण झाला असून, या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत.
 
 
आरोपीचे हे कृत्य मानवतेला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. दोषी नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्याय पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा तसेच त्यांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी करण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@