बांदीपुरा : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल शस्त्रसंधी मागे घेतल्या घेतल्या आज सकाळीच जम्मू काश्मीर येथील बांदीपुरा येथे दहशतवाद्यांनी भआरतीय लष्करावर हल्ला केला. या चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात लष्कराला यश आलं आहे. मात्र दहशतवादी आणि जवान यांच्यात अजूनही चकमक सुरुच आहे.
नुकतेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शस्त्रसंधीबाबतचा निर्णय लांबवला जाणार नाही. तसेच लष्कराने दहशतवाद्यांविरोधात कठोरातील कठोर कारवाई करावी असे आदेश केंद्र सरकारने जवानांना दिले आहेत. गेल्याकाही दिवसांपासून जम्मू आणि काश्मिरात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसत आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. यात दोन पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाला होता. दहशतवादी कारवाया थांबण्याचे नावच घेत नाहीये त्यामुळे आता भारतीय लष्कर पुन्हा एकदा मोठी कारवाई करणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे.