लग्नास नकार दिल्याने गोरंबा येथे एकाचा खून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |
नंदुरबार, १८ जून :
लग्नास नकार दिल्याने ६ जणांनी आटया वळवीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व दगडाने केलेल्या मारहाणीत डोक्याला जबर मार लागून झालेल्या रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाल्याची घटना धडगाव तालुक्यातील गोरंबा येथे घडली. याबाबत हुनारी आटया नाईक यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलीस स्टेशनला शनिवारी गुन्हा दाखल झाला.
 
 
आटया ईरमा वळवी (वय ४५) यांना त्यांच्या मुलीचा विवाह आपल्यासोबत लावून देण्याची मागणी जितेंद्र वळवी याने केली होती. परंतु, मुलगी सज्ञान नसल्याने हा विवाह होणार नाही, असे आट्याने सांगितले. त्याचा राग येवून जितेंद्रने नातेवाईकांसह १५ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारात शिवीगाळ करुन त्याला मारहाण केली. तेव्हा जितेंद्रने जीवे मारण्यासाठी त्यांच्या डोक्यात दगड घातला, असे हुनारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
 
 
याप्रकरणी जितेंद्र ईंदया वळवी, इर्ंंदया बेहडया वळवी, ठांगडया ईंदया वळवी, मोहन ईंदया वळवी, आमटया ईंदया वळवी, बुध्या ईंदया वळवी सर्व रा.गोरंगा, ता.धडगाव,जि.नंदुरबार यांच्याविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि भामरे करीत आहे.
@@AUTHORINFO_V1@@