"माझ्या भावाच्या बदल्यात मला १०० दहशतवाद्यांचा खात्मा पाहिजे" : औरंगजेबच्या भावाची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |

 
 
जम्मू काश्मीर :  नुकतेच काश्मीर येथे अपहरण करुन हत्या करण्यात आलेल्या औरंगजेब या जवानाच्या भावाने आपले दु:ख आणि नाराजी व्यक्त करत " माझ्या भावाच्या हत्येच्या बदल्यात १०० दहशतवाद्यांचा खात्मा पहिजे." असे म्हटले आहे. 'तुम्ही करु शकत नसाल तर तसेही सांगा आम्ही स्वत: करु" असे म्हणत त्याने आपले दु;ख व्यक्त केले आहे. जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांनी औरंगजेबचे अपहरण करत त्याची निघृण हत्या केली. यामुळे तेथील वातावरण तापले असून या घटनेविषयी सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
 
पुलवामामधून अपहरण करण्यात आलेला जवान हा दहशतवादी समीर टायगरच्या चकमकीत सहभागी होता. औरंगजेब हा पूँछ येथे राहणारा होता. सुट्टीसाठी घरी परतत असताना त्याचे सशस्त्र दहशतवाद्यांनी अपहरण केले. त्यानंतर त्याची निघृण हत्या करण्यात आली. काश्मीर येथे पाकिस्तानच्या या कारवाया दिवसेंदिवस वाढतायेत.
 
रमजानच्या काळात भारतीय लष्कराने शस्त्रसंधी जाहीर केली आहे. मात्र, दहशतवाद्यांच्या भारतविरोधी कारवायाच्या सुरूच आहे. औरंगजेबच्या हत्येच्या प्रकरणानंतर हे दिसून आले आहे. त्यामुळे याविषयी महत्वाची ठोस पावले उचलणे आता अत्यावश्यक झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@