जम्मू-काश्मीर : भारत-पाक सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारामध्ये आज सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) चार जवान शहीद झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. भारत-पाक सीमेवरील रामगढ सेक्टरवर ही घटना घडली असून अजून पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरूच आहे.
जम्मू-काश्मीरचे पोलीस संचालक एस.पी.वैद यांनी याविषयी थोड्या वेळापूर्वी माहिती दिली आहे. आज पहाटे अंधाराचा फायदा घेत पाकिस्तान सैनिकांनी रामगढ सेक्टरवर अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून होणाऱ्या या हल्ल्याला भारतीय लष्कराने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. पण अचानक झालेल्या या हल्लामुळे सीमा सुरक्षा दलातील एका सहाय्यक कमांडंटसोबत चार जवान शहीद झाले. तसेच चार जवान जखमी झाले. यानंतर जखमी जवानांना तातडीने शिबारांकडे हलवण्यात आले.