बारामुल्लामधून चार दहशतवादी लष्कराच्या अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |


बारामुल्ला : काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करण्याच्या उद्देशाने आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या चार दहशतवाद्यांच्या भारतीय सुरक्षा दलांनी मुसक्या आवळल्या आहेत. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्तरित्या या दहशतवाद्यांना अटक केली असून या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

बारामुल्लामधील राफीआबाद या ठिकाणी लष्कर-ए-तोयबाचे चार दहशतवादी लपून बसल्याची प्राथमिक माहिती भारतीय लष्कराला मिळालेली होती. यानंतर भारतीय लष्कराने स्थानिक पोलिसांच्या मदतीने दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणी छापेमारी करून चार दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्या सहा स्थानिकांना अटक केली. याबरोबर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, पैसे काही कागदपत्रे, महत्त्वाचे संपर्क आणि इतर साहित्य सुरक्षा रक्षकांनी जप्त केले.


दरम्यान लष्कर-ए-तोयबाने या सर्व दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचे आदेश दिले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना तपासामध्ये मिळालेली आहे. तसेच काश्मीर खोऱ्यात गेल्या महिन्यामध्ये झालेल्या तीन तरुणांच्या हत्येमागे देखील याच दहशतवाद्यांचा हात असल्याचे देखील पोलिसांनी आज स्पष्ट केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@