तुमाकुरू : इंदिरा गांधींच्या काळापासून कॉंग्रेस पक्ष हा गरीब जनतेला फसवत आला असून सत्तेसाठी गरिबांना वेड्यात काढणे हाच त्यांचा उद्योग आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कर्नाटकातील तुमाकुरू येथे आयोजित जन्साभेला संबोधित करताना, आज ते बोलत होते.
'कॉंग्रेस नेहमी 'गरीब गरीब' अशा हाका देते, परंतु देशात सर्वाधिक काळ सत्ता ही त्यांच्याच पक्षाची होती. परंतु तरी देखील त्यांनी गरिबांसाठी अद्याप काहीच का केल नाही ?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच आता जनतेला देखील कॉंग्रेसचे खोटे डाव समजले असून जनताच कॉंग्रेसला त्यांच्या खोटारडेपणाची शिक्षा देत आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
तसेच देशात सध्या केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. गेल्या ३० वर्षांपासून देशात प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प केंद्र सरकारने सुरु केले आहे. महिला आणि शेतकऱ्यांना स्वालंबी बनविण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात असून लवकरच देशाच्या सर्वांगीण विकास झाला असल्याचे नागरिकांना पाहायला मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.