नव वधुवरांनी देखील घेतला सहभाग
दि. २ मे पासून वैवाहिक जीवनाला प्रारंभ करणार्या नितीन जाधव व जयश्री वामने या नववधु-वरांनी काल कोनांबेत श्रमदान केले. यावेळी प्रहारच्या औद्योगिक कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली, राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष राजाराम मुरकुटे, अशोक जाधव, भावेश जाधव यांनीही अभियानात सहभागी होत श्रमदान केले. नवरदेवाचे काका अशोक जाधव यांनी नवरदेवाच्या मिरवणुकीत होणार्या अनाठायी खर्चाला फाटा देत पाणी फाऊंडेशनकडून करण्यात येणार्या कामाच्या डिझेलसाठी २ हजार रुपयांची मदत करून आदर्श निर्माण केला आहे. अभिनेते आमीर खान यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेली ही चळवळ काळाची गरज बनली आहे. त्यांच्या हाकेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. आपण नवीन आयुष्याला सुरुवात श्रमदान करून करावी, असा विचार मनात आला. म्हणून या महाश्रमदान अभियानात सहभागी झालो असल्याचे नितीन म्हणाला.
.