बिहारमध्ये वीज पडून १७ लोकांचा मृत्यू , तर झारखंडमध्ये १४ लोकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
बिहार : सध्या भारतातील काही भागांमध्ये वादळी पाऊस पडत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन काहीसे विस्कटलेले आहे. काल बिहार आणि झारखंडमध्ये वीज पडल्याने बऱ्याच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये १७ तर झारखंडमध्ये १४ नागरिकांचा मृत्यू यामुळे झाला आहे. 
 
 
वादळ आणि वीज पडल्याने आसपासच्या गावांना त्याचा फटका बसला आहे. पावसाला सुरु होणार असला तरी देखील या अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाणी शिरल्याने गुरे वाहून गेली आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना यांचा मोठा फटका बसलेला दिसत आहे. 
 
 
 
भारतातील काही भागांमध्ये अजून देखील पाऊस पडत आहे. आज केरळमध्ये मान्सून बरसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतातील काही भागांमध्ये वादळी पाऊस येत असून केरळ आणि अंदमान निकोबार ये बेटांवर मान्सून येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे आता मान्सून कधी येतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@