अच्छे दिन: दिल्ली ते मेरठ आता केवळ ४५ मिनिटांमध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
नितीन 'रोडकरी' : दिल्ली ते मेरठ आता केवळ ४५ मिनिटांमध्ये, हेच काय अच्छे दिन!  
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस-वे आणि दिल्ली-मेरठ एक्सप्रेस-वे चे उद्घाटन होणार आहे. दिल्लीच्या वाहन कोंडीपासून दिलासा मिळावा यासाठी या नव्या एक्सप्रेस-वे चे निर्माण करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सौर उर्जा याने परिपूर्ण असणारा हा एक्सप्रेस-वे भारतातील पहिला १४ लेनचा एक्सप्रेस-वे ठरणार आहे. 
 
 
 
 
 
सध्या या एक्सप्रेस-वे चे दिल्लीमध्ये ९ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. सौर उर्जेने परिपूर्ण आणि पर्यावरण पूरक हा भारतातील पहिला एक्सप्रेस-वे ठरणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी उद्यान या एक्सप्रेस-वे मध्ये तयार करण्यात येणार आहेत. या एक्सप्रेस-वे च्या माध्यमातून दिल्ली ते मेरठ केवळ ४५ मिनिट लागणार आहेत. 
 
 
 
 
 
 
या दोन्ही एक्सप्रेस-वे मुळे दिल्ली आणि गाजियाबाद येथील वाहतूक कोंडीपासून सुटका मिळेल. तसेच व्यावसायिक वाहतूक यामुळे ३० टक्क्यांनी कमी होईल या दोन्ही एक्सप्रेस-वे वर मिळून दिवसातून ५२,००० गाड्या प्रवास करू शकतात. या एक्सप्रेस-वे मुळे प्रदूषणात घट, वेळेची बचत आणि इंधनची देखील बचत होणार आहे. ५०० दिवसांच्या अथक मेहनतीने हा एक्सप्रेस-वे काही प्रमाणात तयार करण्यात आला असून १३५ किलोमीटर एवढा लांब हा एक्सप्रेस-वे असणार आहे. 
 
 
 
 
 
या एक्सप्रेस-वे च्या निर्माणाला ११००० कोटी रुपये लागले असून उद्या पहिल्या चरणातील एक्सप्रेस-वे चे उद्घाटन करण्यात येणार असून हा भारतातील पहिला १०० टक्के सौर उर्जा वापरणारा एक्सप्रेस-वे ठरणार आहे. या एक्सप्रेस-वे वर २.५ लाख झाडे सध्या लावण्यात आली आहेत. या एक्सप्रेस-वे मध्ये ६ लेन, ७ इंटरचेंजेस आणि ४३० पूल बांधण्यात येणार आहे. भारतातील आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा हा पहिला एक्सप्रेस-वे ठरणार आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@