आनंदाची बातमी : मान्सून अंदमानात दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
गेल्या काही महिन्यापासून उन्हाचे चटके सोसणाऱ्या नागरिकांना आता आनंदाची बातमी मिळणार आहे. काही तासांमध्ये मान्सून अंदमानात दाखल होणार आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्यावर तो काही तासांमध्ये केरळमध्ये दाखल होतो आणि केरळमध्ये मान्सून आल्यावर त्या पाठोपाठ तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरतो आणि महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो. 
 
 
 
त्यामुळे आता इतके दिवस पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराज्याला आनंदाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. ४८ ते ५० तासांमध्ये मान्सून अंदमानात दाखल होण्याचे सांगितले जात आहे त्यानुसार महाराष्ट्रमध्ये २ ते ३ जून या तारखेला पाऊस पडण्यास सुरुवात होईल असा अंदाच हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. उन्हाच्या चटक्याने भाजलेला महारष्ट्र आता लवकरच सुखावणार आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, वर्धा, अमरावती हे जिल्हे सगळ्यात जास्त प्रमाणात मान्सूनची वाट पाहत आहेत. मागील वर्षी विदर्भात कमी पाऊस झाल्याने यावर्षी पाऊस कसा पडतो याकडे सगळ्या जनतेचे लक्ष लागले आहे. 
 
 
 
बंगालच्या उपसागर परिसरासह दक्षिण अंदमान आणि निकोबार बेट परिसरात मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत तो दक्षिण अरबी समुद्र, मालदीव बेट परिसर, तसेच बंगालचा उपसागर परिसर, अंदमान आणि निकोबार बेटावर हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. तसेच त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रासह केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण भागांत दाखल होण्याची शक्यता सध्या वर्तविली जात आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@