जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, दोन नागरिकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
जम्मू-कश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान रोज शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. आज देखील पाकिस्तानकडून सांबा सेक्टरमध्ये भारी गोळीबार करण्यात आला या गोळीबारात स्थानिक दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळपासून पुन्हा पाकिस्तानने गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. 
 
 
 
सांबा, आरएस पुरा, अरनिया या भागांमध्ये सध्या सगळ्यात जास्त गोळीबार पाकिस्तानकडून केला जात आहे. जम्मू-काश्मीरमधील आरएस पुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये देखील पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून आता बऱ्याच महिन्यांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
 
 
 
रमजानच्या काळात भारत कोणतेही अभियान चालवणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने दिला होता. मात्र पुढून जर गोळीबार झाला तरचं भारत यावर कारवाई करेल आणि प्रतिउत्तर देईल असे भारताने सांगितले होते. त्यानुसार आता भारताने प्रतिउत्तर दिले आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@