मुंबई : छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २० मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची माहिती दिली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील ज्या शेतकऱ्यांना आता पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता आला नाही, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या आधी केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा यायोजनेसाठी अर्ज करता येणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
याआधी या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा या हेतूने शासनाने शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्जाची मुदर वाढवून ३१ मार्चपर्यंत केली होती. मात्र आता ही मुदत वाढवून २० मेपर्यंत करण्यात आली आहे.
वंचित शेतकऱ्यांनी नजिकच्या 'आपले सरकार सेवा' केंद्रावर जाऊन किंवा स्वत: माहिती भरून ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.