'मंत्र, तंत्र आणि यंत्र हे भाजपच्या यशाचे रहस्य'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका 

मतपत्रिकेनुसार निवडणुका घेण्याचे आव्हान





मुंबई :
मंत्र, तंत्र आणि 'यंत्र' हेच भारतीय जनता पक्षाच्या यशाचे खरे कारण आहे, अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते.

 
गेल्या तीन चारच वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्व निवडणुकांमध्ये चांगला विजय मिळत असल्याचे दिसत आहे. परंतु पोटनिवडणुकांमध्ये मात्र ते सातत्यने हरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या विजयावरून अनेक जण प्रश्न निर्माण करत असून अनेक जण भाजपवर ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप लावत आहेत. त्यामुळे भाजपने सर्वानाच गैरसमाज दूर करण्यासाठी एकदा मतपत्रिकेवर मतदान घ्यावा, असे आव्हान देखील त्यांनी केले.

भाजपची राजवट भोगलेल्या राज्यांचा अनुभव बोलेल

कर्नाटकामध्ये अनेक वर्ष सत्ता ही भाजपइतर पक्षांकडे होती. त्यामुळे कर्नाटकातील जनता भाजपची राजवट अनुभवू इच्छित आहे. परंतु २०१९ च्या निवडणुकीमध्ये मात्र ज्या राज्यांनी भाजपची सत्ता अनुभवलेली आहे. त्यांचा अनुभव त्या निवडणुकीत बोलेल, असे ते यावेळी म्हणाले. तसेच भाजपला जर खरचं आपल्या स्वतःच्या कामगिरीवर इतका विश्वास असेल त्यांनी देशात मोकळ्या वातावरणात आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात, असे त्यांनी पुन्हा एकदा म्हटले
@@AUTHORINFO_V1@@