मुंबई बॉम्बस्फोटात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात : नवाज शरीफ यांचा खुलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज मोठ्ठा खुलासा केला आहे. २६/११ ला झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता असा खुलासा नवाज शरीफ यांनी केला आहे. पाकिस्तानमधील वृत्तपत्र ‘डॉन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील खुलासा केला आहे. दहशतवाद्यांना समर्थन दिल्यामुळे आज पाकिस्तान वेगळा झाला आहे आणि पाकिस्तानची प्रगती खुंटली आहे असेही त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. 
 
 
पाकिस्तानमध्ये सुरु असलेला २६/११ मुंबई बॉम्बस्फोट खटला याकडे पाकिस्तान दुर्लक्ष करीत असून, अजून देखील हा खटला पूर्ण का झाला नाही? असा प्रश्न यावेळी नवाज शरीफ यांनी उपस्थित केला आहे. नवाज शरीफ यांच्या या वक्तव्याने संपूर्ण जगाला धक्का बसला असून पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच २६/११ मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणला या प्रश्नावर आता विराम लागला आहे. 
 
 
गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय सरकार २६/११ मुंबई बॉम्बस्फोट हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी घडवून आणला आहे असे म्हणत होती, मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही आता मात्र खुद्द पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी हा खुलासा केला असल्याने सगळीकडे चर्चेला उधान आले आहे. 
 
 
मुंबई बॉम्बस्फोटात १५० नागरिक मारल्या गेले ते पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मारले असून पाकिस्तानमध्ये सध्या तीन सत्ता कार्यरत असल्याने या खटल्याचा निकाल लवकर लावला जात नसून अजून देखील पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना कार्यरत आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@