नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली त्या खेळाडूंचे ट्वीटरच्या माध्यमातून मनापासून कौतुक केले आहे. याआधी देखील नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून खेळाडूंचे मनोबल वाढेल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल यासाठी शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती.
आज नरेंद्र मोदी यांनी नेमबाज जितु राय, नेमबाज ओम प्रकाश मिथरवाल आणि प्रदीप सिंग यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नेमबाज मेहुली घोष, नेमबाज अपूर्वी चंदेल यांचे देखील कौतुक केले आहे. भारताला या स्पर्धेत सध्या ८ सुवर्ण, ३ रजत आणि ४ कांस्य पदक मिळाले आहेत सध्या पदकांची एकूण संख्या १५ झाली आहे.