नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसईच्या पेपर फुटीप्रकरणासंबंधीच्या सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. पाच याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून आज फेटाळण्यात आल्या आहेत. ज्या विषयांचे पेपर फुटले त्या विषयांची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी यासंदर्भातील सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या पाच याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
पुन्हा परीक्षा घेण्याचा अधिकार सीबीएसईला आहे आणि याला न्यायालयात आव्हान दिले जावू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सीबीएसई पेपरफुटीनंतर घेण्यात येणाऱ्या फेरपरीक्षांचा निर्णय केंद्र सरकारने काल मागे घेतला होता. त्यानंतर आज या प्रकरणासंबंधी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली.