काँग्रेस सर्व निवडणुका जिंकणार : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |

 
काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता "शेर का बच्चा" आहे
 
नवी दिल्ली : कर्नाटक, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, राजस्थान या सर्व ठिकाणी तसेच २०१९ ची लोकसभा निवडणूक देखील काँग्रेसच जिंकणार. काँग्रेस पक्ष यासाठी भरपूर मेहनत घेत आहे, आम्ही यश संपादन करणारच कारण काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता "शेर का बच्चा" आहे. असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केले. आज नवी दिल्ली येथे जन आक्रोश रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते.
 
 
 
 
काँग्रेस शिवाय शेतकऱ्यांना कुणीच वाली नाही :
 
काँग्रेसशिवाय देशातील शेतकऱ्यांना आधार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसने आवाज उठविला नसता तर पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांची जमिनी बळकाविल्या असत्या असा मोठा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.
 
 
 
देशातील सर्व संस्था नष्ट करण्याचे काम करण्यासाठी रा.स्व. संघाची नेमणूक :

देशातील प्रत्येक संस्थेला नष्ट करण्याचे काम सुरू आहे. सर्वच ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माणसे नियुक्त करण्यात येत आहेत. प्रत्येक मंत्र्यांचे ओएसडीसुध्दा संघाशी संबंधितच आहेत. जनता न्यायाधीशांकडे न्याय मागायला जाते. मात्र, स्वातंत्र्यानंतर ७० वर्षात पहिल्यांदाच न्यायाधीश जनतेकडे न्याय मागायला येतात. मात्र. तरीही पंतप्रधान गप्प का ? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
 
 
 
न खाऊंगा, न खाने दूँगा' हा एक पोकळ दावा : सोनिया गांधी

न खाऊंगा, न खाने दूँगा' हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा पोकळ ठरला आहे. भ्रष्टाचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून सर्वत्र भितीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी टीका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी यावेळी केली.
@@AUTHORINFO_V1@@