नाशिक: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने आयोजित सातव्या जागतिक कृषी महोत्सवाचे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’ने वाचनीय मजकुराची पुरवणी प्रसिद्ध केली. या पुरवणीचे कौतुक करून दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे विचार देणारे दैनिक असून आपण या दैनिकाचे फार पूर्वीपासून वाचक असल्याचे गौरवोद्गार दिंडोरी सेवामार्गाचे गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे यांनी काढले.
नाशिक येथील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानात हजारो शेतकर्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या जागतिक कृषी प्रदर्शनात दै. ‘मुंबई तरुण भारत’चा बोलबाला दिसून आला. प्रदर्शनाच्या ठिकाणी शेकडो स्टॉलवर ‘मुंबई तरुण भारत’च्या अंक व पुरवणीचे वाचन करण्यात येत होते.
प्रदर्शनासाठी जमलेल्या श्री स्वामी समर्थ सेवेकरी व शेतकर्यांनी ‘मुंबई तरुण भारत’मध्ये दिंडोरी सेवामार्गाचे गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे यांचे ‘अमृतवचन’ असे सदर सुरू करावे, अशी मागणी ’मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधींकडे केली. “सेवेकर्यांनीसुद्धा विचार देणार्या दैनिकातील वाचनीय मजकूर वाचला पाहिजे,’’ असे उपस्थित पदाधिकारी व सेवेकर्यांना गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे यांनी सांगितले.