योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला १५ पंतप्रधान पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : राज्यात राबविण्यात आलेल्या ८ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता गेल्या ११ वर्षांमध्ये १५ अधिका-यांना मानाच्या पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. लोकप्रशासनात उल्लेखनीय कामगिरी बजाविणा-या प्रशासन सेवेतील अधिका-यांना या पुरस्कारने गौरविण्यात येते. २१ एप्रिल रोजी नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून पंतप्रधांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यावर्षी देखील नवी दिल्लीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
 
 
ठाणे व नागपूर शहराच्या हबदलत्या स्वरूपावरून प्रधानमंत्री पीक विमा योजना असा प्रवास महाराष्ट्राने आजवर केला. आहे. २००६ सालचा पहिला पंतप्रधान पुरस्कार हा डॉ.टी चंद्रशेखर यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी ठाणे व नागपूर शहराचा केलेला कायापालट देशात उल्लेखनीय ठरला होता. तर २००६ सालीच कोल्हापूर जिल्हा परिषदेने सुरू केलेला राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण अभियान कार्यक्रम देशात उल्लेखनीय ठरला, या उपक्रमासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर देशमुख व महावीर माने यांना पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 
 
नदीजोड प्रकल्पासाठी विजय सिंघल यांना पुरस्कार
जळगाव येथे नदीजोड प्रकल्प कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांना २००८ साली पंतप्रधान पुरस्कार देण्यात आला होता. तर २००९ साली मलकापूर शहरासाठी चोवीस तास पाणी प्रकल्प उल्लेखनीय ठरला, हा उपक्रम यशस्वीरित्या राबविणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र होलानी व त्यांच बरोबर अभियंते सदानंद भोपळे, यशवंत बसुगडे, उत्तम बगाडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
 
 

कृषी आयुक्तालयाचाही गौरव
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात तत्कालीन आयुक्त विजय नाहटा यांनी राबविलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र या उपक्रमास २००९साली पुरस्कार देण्यात आला. तर राज्याच्या कृषी आयुक्तालयास राज्यात कीटक पर्यवेक्षण व कीटक व्यवस्थापन प्रकल्प प्रभावीपणे राबविल्यामुळे २०१२ साली पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 
 

कौशल्य विकास योजनेसाठीही पुरस्कार
आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी तरुणांना कौशल्य विकासाची योजना राबविल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी रंजीत कुमार, अभिषेक कृष्णा, टिकेएस रेड्डी व वाय. एस शेंडे यांना सन २०१३-१४ यावर्षांचा पंतप्रधान पुरस्कार देण्यात आला. सन २०१७ यावर्षी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना पंतप्रधान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
दोनशेहून अधिक अधिका-यांचा गौरव
सन २००६ ते २०१७ या कालावधीत देशातील २०१ अधिकाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सन २००६-२००७ या वर्षी सर्वाधिक ६१ अधिकाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले तर २०१३-१४ या वर्षी २७ अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@