लालू यादव यांची याचिका न्यायालयाने फेटाळली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
रांची : चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले राजद प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची जामीन याचिका आज झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. लालू प्रसाद यांच्याकडून आरोग्याशी निगडीत जामीन याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
 
 
आरोग्य खराब असल्याने जामीन मिळावा अशी याचिका लालू प्रसाद यांच्याकडून न्यायालयात दाखल करण्यात आली होती, मात्र ही याचिका आता उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांना आता कारागृहातच दिवस काढावे लागणार आहे. चारा घोटाळा प्रकरणात दोषी आठळून आल्याने लालूप्रसाद यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 
 
काय आहे प्रकरण ?
 
चारा घोटाळा हा बिहारच्या राजकारणातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जातो. १९९६ मध्ये पशू खाद्यासाठी सरकारी खजिन्यातून ९५० कोटी रुपये घेण्यात आले होते, परंतु त्यावेळचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते जगन्नाथ मिश्र यांनी हे सर्व पैसे खाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. यानंतर भाजपने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती, यामध्ये लालू यांच्या हात असल्याचे दिसू लागल्यानंतर लालू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर न्यायालयाने त्यांना यात दोषी ठरवत या निवडणूक बंदी देखील घातली होती.
 
@@AUTHORINFO_V1@@