माझा संयम जेव्हा संपेल, तेव्हा मी देशाच्या कामा येणार नाही : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
लंडन : ज्या दिवशी माझा संयम संपेल त्या दिवसापासून मी देशाच्या कामाला येणार नाही असे स्पष्ट मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. काल लंडन येथे ‘भारत की बात सबके साथ’ या कार्यक्रमाला संबोधित करतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. माझा संयमच माझी ताकद आहे आणि याला मी कायम ठेवले तर मी देशासाठी खूप चांगल्या गोष्टी करू शकतो असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 

आपण जेव्हा आशा आणि निराशा या संकल्पनेत अडकतो तेव्हा केवळ स्वत:साठी काहीतरी करायचे आहे किंवा स्वत:चा विकास करायचा आहे अशा विचारांमध्ये आपण असतो. मात्र आपण जेव्हा ‘सर्वजण हिताय आणि सर्वजण सुखाय’ असा विचार करतो तेव्हा आपण या संकल्पनेपासून जरा वेगळा विचार करतो आणि जनतेच्या आशा आकांशा यांचा विचार आधी करतो असे ते यावेळी म्हणाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@