न्यायालयामुळे यांचा खोटारडेपणा उघड : मुख्यमंत्री फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |

लोया प्रकरणावरून कॉंग्रेसची कानउघडणी

काँग्रेसवाल्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी




मुंबई : जस्टीस लोयांच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राहुल गांधी आणि डाव्या पक्षांचा खोटारडेपणा आता जनतेसमोर उघड झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेसवाल्यांनी भाजपसह संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लोया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज केलेल्या सुनावणीवर पत्रकारांशी ते बोलत होते.

भाजप अध्यक्ष अमित शाह यांना बदनाम करण्यासाठी म्हणून कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांकडून जाणूनबुजून हा डाव रचला गेला होता. काही माध्यमांनी देखील स्वतःच्या स्वार्थासाठी हा मुद्दा उचलून धरला होता. परंतु न्यायालयाने यावर सुनावणी करून या सर्वांचा खोटारडेपणा जनतेसमोर आणला आहे. कॉंग्रेसच्या या कृतीचे आम्ही कठोर निंदा करतो आणि कॉंग्रेसने याची जाहीरपणे माफी मागावी, अशी आम्ही मागणी करतो', असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले.

 
जस्टीस लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिकपणेच झाला असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. या प्रकरणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावल्या. त्यामुळे भाजप आरोप करणारा काँग्रेस पक्ष हा चांगलाच तोंडघशी पडला आहे. त्यामुळे भाजप आणि विरोधक यांच्यात आता नवा कलगीतुरा पाहायला मिळत आहे.
@@AUTHORINFO_V1@@