राज्यातील वन विभागाचे रविना टंडन यांच्याकडून कौतुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मुंबई : महाराष्ट्राच्या वन विभागाने राज्यातील वृक्षाच्छादन वाढवतांना पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासाठी केलेले काम खूप अभिनंदनीय असून विभागाचे हे सुंदर काम राज्यातील जनतेसमोर मांडण्यात यावे असे मत अभिनेत्री रविना टंडन यांनी व्यक्त केले.
 
 
राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, विभागाने इको साईट रिजनरेट करण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने हाती घेतले आहे. ग्रामीण भागात या कामाला उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी शहरी भागात ही यासंबंधीची जनजागृती होणे गरजेचे आहे. नागरी भागात हरित सेना वाढवावी, शहरातील विद्यार्थ्यांना पर्यावरणस्नेही उपक्रमात सहभागी करून घेतले जावे, वृक्ष माणसाला काय काय देतो हे शहरी मुलांना प्रत्यक्षात जंगल भेटी घडवून आणून समजून सांगितले जावे, असे त्या म्हणाल्या.
 
 
 
कांदळवन संवर्धनात झालेली वाढ कौतूकास्पद असल्याचे सांगून टंडन यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची विशेषत्वाने नोंद घेतली. तुम्ही इतके चांगले काम करता तर ते लोकांना समजू द्या, त्यांना ते बघू द्या अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. मुंबईसारख्या शहरात वृक्ष लावायला जागा नसेल परंतू आज येथील शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे उद्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आस्थापनांमध्ये काम करणार आहेत, शालेय जीवनात त्यांच्या मनात वन, वन्यजीव आणि वृक्ष लागवड याविषयी प्रेम निर्माण झाले तर मोठे झाल्यावर त्यासाठी निधी देण्यासाठी त्यांचा कल अधिक चांगला राहील असेही त्या म्हणाल्या.
@@AUTHORINFO_V1@@