मुंबईत प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या बाईक ॲम्बुलन्सच्या माध्यमातून आठ महिन्यात अडीच हजारापेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. ऑगस्ट २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत २५०० हून अधिक रुग्णांना बाईक ॲम्बुलन्सने तात्काळ प्रतिसाद आणि प्राथमिक उपचार देऊन त्यांना जीवदान दिले आहे