प्लास्टिक बॉटलची विल्हेवाट २१ दिवसात लावा - आयुक्तांचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 

पाणी पिण्यासाठी काचेचे जग, पेपर ग्लास वापरावे 
 
 
मुंबई : राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली आहे. परंतु मुंबई महापालिकेच्या कार्यालयांमध्ये पाणी पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटलचा वापर करण्यात येत आहे. प्लास्टिक बंदी असल्यामुळे महापालिकेच्या कार्यालयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक बॉटलची २१ दिवसात विल्हेवाट लावावी आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहे.
 
 
 

 
 
 
मुंबई महापालिकेच्या कार्यालयांना नागरिक मोठ्या प्रमाणात कामानिमित्त भेटी देतात. पालिका कार्यालयांमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकाही होतात. या बैठकांमध्ये प्लास्टिक पाण्याच्या बॉटल वापरण्यात येतात. प्लास्टिक बॉटलच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे आयुक्तांनी पालिकेच्या सर्व कार्यालयांना प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या कार्यालयांमध्ये पाणी पिण्याचे यंत्र तसेच कुलर लावण्यात आले आहेत. त्यांच्या जलशुद्धतेची पाहणी करण्यात यावी. जरुरत असल्यास पाण्याचे शुद्धीकरण करण्यात यावे. पालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख तसेच कार्यालयीन सभा बैठकांमध्ये उपस्थितांना पाणी देण्यासाठी काचेचे जग, पेपर ग्लास यांचा वापर करावा, तसेच कार्यालय परिसर प्लास्टिक मुक्त असल्याचे सूचना फलक लावण्यात यावे असे परिपत्रकात म्हटले आहे.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@