भारताला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक तरूणांनी क्रांतिच्या यज्ञात प्राणाची आहूती दिली. १३ एप्रिल १९१९ साली ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात बंड करण्यासाठी आणि रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी जालियनवाला बागेत सभेचे आयोजन करण्यात आले. आज या घटनेला ९९ वर्ष पूर्ण झाली तरीही ते घाव अजूनही प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनावर तितकेच ताजे आहेत .