कोलंबो : भारत आणि बांग्लादेश यांच्यात आजचा टी-२० सामना सुरु झाला असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून सध्या मैदानावर बांग्लादेशचे खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. प्रेमदासा मैदानावर हा सामना सुरु असून सध्या बांग्लादेश ११९ धावांवर सहा बाद अशा स्थितीत खेळत आहे.
काल प्रेमदासा मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यात या मालिकेतील पहिला टी-२० सामना खेळला गेला या सामन्यात श्रीलंकेने भारतावर पाच गडींनी विजय मिळविला. त्यामुळे आजचा सामना भारताला जिंकणे गरजेचे आहे. यापुढील सामना आता श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे. याआधी आजचा सामना कोण जिंकत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.