राज्याच्या उन्नतीसाठी सहकारक्षेत्र समृद्ध होणे गरजेचे : सुभाष देशमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 

 
 
 
नाशिक : ‘राज्याच्या उन्नतीसाठी सहकारक्षेत्र समृद्ध होणे गरजेचे असून समाजाची गरज लक्षात घेऊन सहकाराचे जाळे विस्तारित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
 
सिन्नर येथे श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभ आणि श्रीमंत भूषण पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, माणिक कोकाटे, सिन्नरचे नगराध्यक्ष करण ढगळे, सुरेश पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, रयत शिक्षण संस्थेचे भगीरथ शिंदे आदी उपस्थित होते.
 
देशमुख म्हणाले, बंद पडलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि बचतगटांना अनुदान नव्हे तर योगदानातून सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी प्रोत्साहन आणि दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान न घेता ८५० संस्था सक्षम होत आहेत.
 
निफाड आणि नाशिक येथील बंद असलेले सहकारी कारखाने आगामी काळात सुरू करण्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ’’सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. चांगल्या पतसंस्था उभ्या करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पतसंस्थांनी २० टक्के लाभ गावाच्या उन्नतीसाठी वापरावा. त्यामुळे सामान्य माणसाला त्याचा लाभ होईल. तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी त्यांना पतसंस्थांनी आर्थिक पाठबळ द्यावे,’’ असे आवाहन त्यांनी केले.
 
भुसे म्हणाले, ‘‘सहकार क्षेत्रात महाराष्ट्राने देशाला मार्गदर्शन केले आणि या क्षेत्रात राज्याचे योगदानही मोठे आहे. प्रत्येकाच्या सहभागातून विकासप्रक्रिया गतिमान होत असल्याने प्रत्येकाला आपले चांगले योगदान या क्षेत्रात देता येते. ग्रामीण विकासात पतसंस्थांनीदेखील चांगले योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावेळी राजकारण व समाजकारण क्षेत्रासाठी तुकाराम दिघोळे, शैक्षणिक कार्यासाठी निलिमा पवार आणि संत साहित्य अभ्यासासाठी ह.भ.प.महामंडलेश्‍वर डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पतसंस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार वाजे यांच्यासह पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@