सर्व राज्यांमध्ये जेव्हा भाजपचे सरकार येईल तेव्हाच आमचे सुवर्ण युग :अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : देशातील सर्व राज्यांमध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार येईल तेव्हाच भाजपचे खरे सुवर्ण युग सुरु होईल असे मत भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केले आहे. आज नवी दिल्ली येथे ‘नमो योजना मदत केंद्रा’चे उद्घाटन करताना जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.
 
 
 
 
 
 
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर भारतात पूर्ण बहुमत प्राप्त करणारे सरकार हे केवळ भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. २०१४ मध्ये जनतेने भाजपला बहुमत देवून निवडून दिले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. नमो योजना मदत केंद्र हे गरिबांसाठी तसेच समाजात ज्या घटकाला गरज आहे अशा नागरिकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
 
 
 
 
 
गरीब, आदिवासी, मागास वर्ग आणि वृद्ध अशा सगळ्यांसाठी मोदी सरकारने ११२ योजना तयार केल्या आहेत. त्यामुळे या योजना या सगळ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. या नव्या योजनेच्या माध्यमातून या योजना पोहोचविल्या जातील असे त्यांनी यावेळी सांगितले. केरळ, बंगाल, कर्नाटक आणि ओडीसा या राज्यांमध्ये जोपर्यंत भाजपचे सरकार येत नाही तोपर्यंत भाजपचा सुवर्ण कालखंड सुरु होणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@