जागतिक शांततेसाठी विज्ञान आणि आध्यात्माचा समन्वय आवश्यक - डॉ. के. बी. पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |
 

 
 
जागतिक शांततेसाठी विज्ञान आणि आध्यात्माचा समन्वय आवश्यक -  डॉ. के. बी. पाटील
जळगाव -  जागतिक शांततेसाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न होत असतांना विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात समन्वय साधल्यास मानव जीवन सुमखय आणि मूल्याधिष्ठ बनण्यास मदत होईल. वैज्ञानिक शोधांचा उद्देश मुळात मानव समाजाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी आहे आणि आध्यात्माचा उद्देशही तोच आहे तेव्हा दोघांनी हातात हात घेऊन चालणे आवश्यक असल्याचे मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठो माजी कुलगुरु  डॉ. के. बी. पाटील यांनी व्यक्त केले.निर्मल मीडिया पब्लिकेशन, जळगाव प्रकाशित आणि येथील भगीरथ शाळेतील उपशिक्षक डॉ. विजय शांताराम पाटील लिखित “मानवतेला समर्पित आध्यात्मिक संस्था” व “आध्यात्मिक संस्थांचे कार्य आणि समाज परिवर्तन” या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभा प्रसंगी ते बोलत होते.
विज्ञान व अध्यात्मामध्ये एकाग्रता आणि शांती दोघांची भूमिका :
प्राचार्य डॉ. के. पाटील पुढे म्हणाले की, विज्ञानाचे बहुतांश शोधाचे मुळ हे शांततेमध्ये आहे. वैज्ञानिक विचार करतात, शोध घेतात त्यास शांतता, एकाग्रता हवी असते आणि आध्यात्मात ध्यान, मेडिटेशन साठी सुध्दा याच गुणांची आवश्यकता आहे. हे दोघांमधील साम्य सांगता येईल. धर्म आणि आध्यात्मिक संप्रदाय शांती, अहिंसा, प्रेम, सदाचार, सदभावना आदि मूल्यांना धारण करण्याची शिकवण देतो. अध्यात्म हा आपल्या जगण्यातील जीवनशैलीचा एक भाग आहे. दुस-या शब्दात अध्यात्माला परोपकार असे म्हणतात. परमार्थ म्हणजे परम अर्थ, श्रेष्ठ अर्थ. आपल्या जगण्यातील श्रेष्ठ अर्थ उमगणे म्हणजे परमार्थ होय. यापुढील उद्दीष्ट म्हणजे आपल्या सोबत समकालीन सर्वाचेच जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खरोखरीचे अध्यात्मिक जीवन जगणे होय.
आध्यात्मिक साहित्याची आवश्यकता - मेजर नाना वाणी
भगीरथ इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष मेजर नाना वाणी यांनी याप्रसंगी चांगल्या आध्यात्मिक साहित्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, डॉ. विजय पाटील यांच्या पुस्तकात विविध आध्यात्मिक संस्था ह्या मानवाचा मानसिक, आध्यात्मिक विकासासाठी कशा प्रकारे कार्य करीत आहेत याचा संशोधनात्मक आढावा घेतलेला आहे. आधुनिक युगात मानवाला सौख्यपूर्ण जगण्यासाठी मार्गदर्शन आणि मदतीची आवश्यकता असते. याची पुर्तता मानवतेला समर्पित विविध आध्यात्मिक संस्था करीत असल्याचे दिसून येते. मानवमात्रांचे कल्याण साधणा­या या संस्था आणि त्यांच्या संस्थापकांचा परिचय होईल. विशेषत: मानवतेच्या सेवाकार्याची माहिती वैश्विक स्तरावर मानवमात्रांच्या सौख्यासाठी सेवा कार्याच्या माध्यमातून विधायक विश्वपरिवर्तनाचा संकेत डॉ. पाटील यांच्या पुस्तकातून दिसून येतो.
पुस्तक प्रकाशन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन :
तत्पूर्वी पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्मल मीडिया पब्लिकेशनच्या संकेतस्थळाचे उदघाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, भगीरथ इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष मेजर नाना वाणी, मुकुल भाई, पुणे, विवेकानंद क्लासेसचे प्रा. संदिप पाटील, ज्येष्ठ राजयोगी शांताराम पाटील, लेखक डॉ. विजय पाटील, डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्या हस्ते झाले .
 
@@AUTHORINFO_V1@@