ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट ६५ वरून ६० होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

दोन महिन्यांमध्ये निर्णय; सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांची माहिती

 
 
 
 
मुंबई : ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट शिथील करण्यावर विचार सुरू असून वयाची अट ६५ वरून ६० करण्याबाबात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. तसेच येत्या दोन महिन्यांमध्ये हा याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
 
विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा व इतर समस्यांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना कांबळे बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी महानगरपालिका क्षेत्रात ज्या जागा ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी आरक्षित ठेवल्या आहेत, त्या तशाच ठेवण्याबाबत तसेच या जागा वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
 
तसेच मातोश्री वृद्धाश्रम योजने अंतर्गत ज्या संस्थांचे अनुदान बंद झाले त्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने कोल्हापूरच्या धर्तीवर आजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सुरु करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतनीस देणाऱ्या संस्थेने अशा मदतदारांची पूर्ण चौकशी करुनच त्यांना पाठवावे, असे संबंधीत संस्थेला निर्देश देण्यात येतील, असे न केल्यास व मदतनीसांकडून काही गुन्हा घडल्यास संबंधीत संस्थेला सहआरोपी करण्यात येणार असल्याचे कांबळे म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@